Logo
Logo
mic
Download
सार्थ श्रीमद्‍ भगवद्‍गीता – अध्याय ३

सार्थ श्रीमद्‍ भगवद्‍गीता – अध्याय ३

Duration

2hr 36m

Language

Marathi

Released

Category

Devotional

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर दिलेला उपदेश श्रीमद्भगवद्गीता म्हणून ओळखला जातो. श्रीमद्भगवद्गीतेची पार्श्वभूमी महाभारताच्या युद्धाची आहे. ज्याप्रमाणे सामान्य माणूस आपल्या जीवनातील समस्यांमुळे गोंधळून जातो आणि त्यानंतर जीवनाच्या एकसंधतेपासून पळून जाण्याचा निर्णय घेतो, त्याचप्रमाणे महाभारताचा महान नायक अर्जुन आपल्यासमोर येणाऱ्या समस्यांपासून घाबरतो, निराश होतो,अर्जुनाप्रमाणेच आपण सर्वजण कधी ना कधी अनिश्चिततेच्या अवस्थेत निराश होतो किंवा आपल्या समस्यांमुळे विचलित होऊन आपल्या कर्तव्यापासून दूर जातो, अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आणि आपल्याला दिशा दाखवण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत, सार्थ श्रीमद भगवद्गीता आणि त्याचा अर्थ आता आपल्या मराठी भाषेत.

Read More

श्लोक १

1 - श्लोक १

04 min 56 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
श्लोक २

2 - श्लोक २

04 min 53 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
श्लोक ३

3 - श्लोक ३

04 min 26 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
श्लोक  ४

4 - श्लोक ४

03 min 25 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
श्लोक ५

5 - श्लोक ५

03 min 43 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
श्लोक ६

6 - श्लोक ६

00 min 59 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
श्लोक ७

7 - श्लोक ७

04 min 27 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
श्लोक ८

8 - श्लोक ८

01 min 33 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
श्लोक ९

9 - श्लोक ९

02 min 42 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
श्लोक १०

10 - श्लोक १०

07 min 34 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share

सार्थ श्रीमद्‍ भगवद्‍गीता – अध्याय ३

Devotional|Marathi|42 Episodes
Like
share
like

About Show

श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर दिलेला उपदेश श्रीमद्भगवद्गीता म्हणून ओळखला जातो. श्रीमद्भगवद्गीतेची पार्श्वभूमी महाभारताच्या युद्धाची आहे. ज्याप्रमाणे सामान्य माणूस आपल्या जीवनातील समस्यांमुळे गोंधळून जातो आणि त्यानंतर जीवनाच्या एकसंधतेपासून पळून जाण्याचा निर्णय घेतो, त्याचप्रमाणे महाभारताचा महान नायक अर्जुन आपल्यासमोर येणाऱ्या समस्यांपासून घाबरतो, निराश होतो,अर्जुनाप्रमाणेच आपण सर्वजण कधी ना कधी अनिश्चिततेच्या अवस्थेत निराश होतो किंवा आपल्या समस्यांमुळे विचलित होऊन आपल्या कर्तव्यापासून दूर जातो, अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आणि आपल्याला दिशा दाखवण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत, सार्थ श्रीमद भगवद्गीता आणि त्याचा अर्थ आता आपल्या मराठी भाषेत.

....Loading

EpisodesDuration
श्लोक १

1 . श्लोक १

अर्जुन उवाच ज्यायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन । तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव ॥ ३-१ ॥ अर्जुन म्हणाला, हे जनार्दन श्रीकृष्णा, जर तुम्हाला कर्माहून ज्ञान श्रेष्ठ वाटते, तर मग हे केशवा (श्रीकृष्णा), मला भयंकर कर्म करण्यास का प्रवृत्त करीत आहात? ॥ ३-१ ॥

More

04 min 56 sec

play

share

श्लोक २

2 . श्लोक २

व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे । तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्‌ ॥ ३-२ ॥ तुम्ही मिश्रितशा भाषणाने माझ्या बुद्धीला जणू मोहित करीत आहात. म्हणून अशी एकच गोष्ट निश्चित करून मला सांगा की ज्यामुळे माझे कल्याण होईल. ॥ ३-२ ॥

More

04 min 53 sec

play

share

श्लोक ३

3 . श्लोक ३

श्रीभगवानुवाच लोकेऽस्मिन्द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ । ज्ञानयोगेन साङ्ख्यानां कर्मयोगेन योगिनाम्‌ ॥ ३-३ ॥ भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे निष्पापा, या जगात दोन प्रकारची निष्ठा माझ्याकडून पूर्वी सांगितली गेली आहे. त्यातील सांख्ययोग्यांची निष्ठा ज्ञानयोगाने आणि योग्यांची निष्ठा कर्मयोगाने होते. ॥ ३-३ ॥

More

04 min 26 sec

play

share

श्लोक  ४

4 . श्लोक ४

न कर्मणामनारम्भान्नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते । न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति ॥ ३-४ ॥ मनुष्य कर्मे केल्याशिवाय निष्कर्मतेला म्हणजेच योगनिष्ठेला प्राप्त होत नाही आणि फक्त कर्मांचा त्याग केल्याने सिद्धीला म्हणजेच सांख्यनिष्ठेला प्राप्त होत नाही. ॥ ३-४ ॥

More

03 min 25 sec

play

share

श्लोक ५

5 . श्लोक ५

न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत्‌ । कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिर्जैगुणैः ॥ ३-५ ॥ निःसंशयपणे कोणीही मनुष्य कोणत्याही वेळी क्षणभरसुद्धा काम न करता राहात नाही. कारण सर्व मनुष्यसमुदाय प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांमुळे पराधीन असल्यामुळे कर्म करायला भाग पाडला जातो. ॥ ३-५ ॥

More

03 min 43 sec

play

share

श्लोक ६

6 . श्लोक ६

कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन्‌ । इन्द्रियार्थान्विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते ॥ ३-६ ॥ जो मूर्ख मनुष्य सर्व इंद्रिये बळेच वरवर आवरून मनाने त्या इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करीत राहतो, तो मिथ्याचारी म्हणजे दांभिक म्हटला जातो. ॥ ३-६ ॥

More

00 min 59 sec

play

share

श्लोक ७

7 . श्लोक ७

यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन । कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते ॥ ३-७ ॥ परंतु हे अर्जुना, जो मनुष्य मनाने इंद्रियांना ताब्यात ठेवून आसक्त न होता सर्व इंद्रियांच्या द्वारे कर्मयोगाचे आचरण करतो, तो श्रेष्ठ होय. ॥ ३-७ ॥

More

04 min 27 sec

play

share

श्लोक ८

8 . श्लोक ८

नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः । शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येदकर्मणः ॥ ३-८ ॥ तू शास्त्रविहित कर्तव्यकर्म कर. कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे. तसेच कर्म न करण्याने तुझे शरीरव्यवहारही चालणार नाहीत. ॥ ३-८ ॥

More

01 min 33 sec

play

share

श्लोक ९

9 . श्लोक ९

यज्ञार्थात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः । तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर ॥ ३-९ ॥ यज्ञानिमित्त केल्या जाणाऱ्या कर्मांशिवाय दुसऱ्या कर्मात गुंतलेला हा मनुष्यसमुदाय कर्मांनी बांधला जातो. म्हणून हे कुंतीपुत्र अर्जुना, तू आसक्ती सोडून यज्ञासाठी उत्तम प्रकारे कर्तव्यकर्म कर. ॥ ३-९ ॥

More

02 min 42 sec

play

share

श्लोक १०

10 . श्लोक १०

सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः । अनेन प्रसविष्यध्वमेष वोऽस्त्विष्टकामधुक्‌ ॥ ३-१० ॥ प्रजापती ब्रह्मदेवाने कल्पारंभी यज्ञासह प्रजा उत्पन्न करून त्यांना सांगितले की, तुम्ही या यज्ञाच्या द्वारे उत्कर्ष प्राप्त करून घ्या आणि हा यज्ञ तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण करणारा होवो. ॥ ३-१० ॥

More

07 min 34 sec

play

share